Kannada NewsKarnataka News

बटाटा पीक नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: कष्टाने पै-पै जमवून बटाट्याची बियाणे पेरलेल्या शेतकऱ्याने पडणाऱ्या धो-धो पावसाने बियाणे कुजून गेल्याने आत्महत्या केली आहे. आपल्या शेतातील झाडाला गळफास घालून घेऊन शनिवारी शेतकरी मरण पावला आहे.
अशोक कृष्णा बामणे वय वर्ष 59 असे गोजगे गावातील मृत व्यक्तीचे नाव आहे. अशोक यांनी गेल्या काही दिवसांमागे बटाट्याची बियाणे तसेच त्याला लागणारे खत आणि औषधेही ही विकत घेऊन पेरणी केली होती, पण सतत पडणाऱ्या पावसामुळे बटाट्याचे बियाणे संपूर्ण कुजून गेल्याने दुःखी झालेल्या अशोक यांनी गळपास घालून आत्महत्या केल्याचे समजते. काकती पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून यांच्या पश्चात आई,पत्नी ,आणि दोन मुले आहेत.

Related Articles

Back to top button